rashifal-2026

देशातील सर्वात मोठी बाजरपेठ लासलगाव बाजार समिती अनिश्‍चित काळासाठी बंद

Webdunia
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (16:51 IST)
व्यापारी वर्गाकडे शेतकर्‍यांना देण्यासाठी लहान स्वरूपातील चलन नसल्याने आशिया आणि देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर यांनी दिलेली आहे.
 
पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांत १०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने उन्हाळ कांद्याची विक्री होत असून, हा कांदा एप्रिल व मेमध्ये साठवणूक केलेला आहे. त्यामुळे तो खराब होत असून, शेतकर्‍यांना हा कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच नवीन लाल कांदा बाजार आवारात येण्यास सुरुवात झाल्याने व तो टिकाऊ नसल्याने काढणीनंतर शेतकर्‍यांना हा कांदा लगेच विक्री करावा लागत आहे. मका, सोयाबीनची काढणी जोरात सुरू आहे. येत्या हंगामाची तयारी करण्यासाठी बी-बियाणो व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी, तसेच दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्यासाठी शेतकर्‍यांना सध्या पैशांची आवश्यकता असल्याने शेतकरी हा शेतीमाल मोठय़ा प्रमाणावर विक्रीस आणत आहे. अशा परिस्थितीत चलन तुटवड्यामुळे लिलाव बंद राहिल्यास येथील शेतकर्‍यांची माल विक्रीची गैरसोय होत आहे. चलन पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यामुळे शेतीमाल लिलावाबाबत अनिश्‍चितता निर्माण झालेली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी निराश आहे; संजय राऊत यांनी निशाणा साधला; तुम्हाला शांततेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर.......

इच्छामरणाची मागणी असलेले हरीश राणा यांचे एम्समध्ये निधन; वेदनादायी श्वासातून मुक्ती

भोंदू बाबा अशोक खरात देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत गुपिते उघड केली

मुंबईत : भटक्या कुत्र्याच्या चाव्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडले, चौथीतील विद्यार्थिनीचा वेदनादायक मृत्यू

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

पुढील लेख
Show comments