Festival Posters

रायगडसाठी ऑरेंज अलर्ट

Webdunia
बुधवार, 7 जुलै 2021 (22:15 IST)
राज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून मुंबईतील किमान तापमानात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, मुंबईकरांची घामाच्या धारांपासून आता मुक्तता होऊ शकेल. पुढील काही दिवसांत पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने (IMD) दिले आहेत. येत्या शनिवार आणि रविवारसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई व ठाण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
रायगडसाठी ऑरेंज अलर्ट
रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रायगडातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस होऊ शकेल. रविवारी पश्चिम-मध्य आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा टप्पा तयार होण्याची शक्यता असल्याने पाऊस पुन्हा जोर धरू शकेल. दरम्यान, बुधवारी मुंबई आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये काही काळ रिमझिम पाऊस पडला.
 
२.६६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध 
मागील २४ तासांत हवामान खात्याच्या कुलाबा येथील वेधशाळेने १५ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेने १७.९ मिमी पावसाची नोंद केली. तसेच १ जूनपासून आतापर्यंत कुलाबा वेधशाळेनुसार  ७१४.६ मिमी आणि सांताक्रूझ वेधशाळेनुसार ९८७ मिमी पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २.६६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

भारतीय इतिहासातील सर्वात मोठी दरोडा! १००० कोटी रुपये घेऊन जाणारा ट्रक गायब झाला

Hapus Mango पुण्यातील फळ बाजारात हापूस आंब्याची एंट्री, पहिली पेटी १५,००० रुपयांना विकली गेली

पद्म पुरस्कार: ५ पैकी ३ पद्मविभूषण केरळवासीयांना... शशी थरूर यांनी आनंद व्यक्त केला

संजय राऊत यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला, "जर मला सत्ता मिळाली तर मी त्याचे १५ तुकडे करेन"

पुढील लेख
Show comments