Dharma Sangrah

रायगडसाठी ऑरेंज अलर्ट

Webdunia
बुधवार, 7 जुलै 2021 (22:15 IST)
राज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून मुंबईतील किमान तापमानात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, मुंबईकरांची घामाच्या धारांपासून आता मुक्तता होऊ शकेल. पुढील काही दिवसांत पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने (IMD) दिले आहेत. येत्या शनिवार आणि रविवारसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई व ठाण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
रायगडसाठी ऑरेंज अलर्ट
रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रायगडातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस होऊ शकेल. रविवारी पश्चिम-मध्य आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा टप्पा तयार होण्याची शक्यता असल्याने पाऊस पुन्हा जोर धरू शकेल. दरम्यान, बुधवारी मुंबई आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये काही काळ रिमझिम पाऊस पडला.
 
२.६६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध 
मागील २४ तासांत हवामान खात्याच्या कुलाबा येथील वेधशाळेने १५ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेने १७.९ मिमी पावसाची नोंद केली. तसेच १ जूनपासून आतापर्यंत कुलाबा वेधशाळेनुसार  ७१४.६ मिमी आणि सांताक्रूझ वेधशाळेनुसार ९८७ मिमी पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २.६६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला! भाजप लढवणार सर्वाधिक जागा; शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादीला किती मिळणार?

LIVE: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्यात इंधनाचा पुरेसा साठा

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधून बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेला अटक केली

छगन भुजबाळ यांनी "राज्यात केवळ महिनाभर पुरेल इतकाच पेट्रोल-डिझेलचा साठा" वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली; मात्र फडणवीस यांनी "कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका स्पष्टीकरण दिले

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात: कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी दुभाजकाला धडकली; दोन वृद्धांचा जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments