Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या 5 वर्षात रस्त्यावरून पेट्रोलची वाहने गायब होतील, नितीन गडकरींचा मोठा दावा

Webdunia
सोमवार, 11 जुलै 2022 (23:14 IST)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग उभारणीचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित झाले. याशिवाय रस्ते आणि वाहनांच्या सुरक्षेबरोबरच हरित ऊर्जेच्या वापरावरही ते भर देत असतात. अलीकडेच ते  हायड्रोजनवर चालणाऱ्या कारने चर्चेत आले होते .आता पुढील पाच वर्षांत पेट्रोलच्या गाड्या भारतातील रस्त्यांवरून गायब होतील, असा दावा मंत्र्यांनी केला आहे. पाच वर्षांनंतर भारतात पेट्रोलची गरज भासणार नाही, असेही ते म्हणाले. 
 
गडकरी म्हणाले की, हरित इंधनामुळे आगामी काळात पेट्रोलची गरज संपुष्टात येईल. त्यांनी दावा केला की, काही वर्षांनी देशातील केवळ कारच नव्हे तर स्कूटरही ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल फ्लेक्स इंधन, सीएनजी किंवा एलएनजीवर चालतील.केंद्रीय मंत्री गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अकोला येथे एका कार्यक्रमात सहभागी होत असताना त्यांनी हे वक्तव्य केले  अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. आपल्या भाषणात गडकरींनी हायड्रोजन, इथेनॉल आणि इतर हरित इंधनाच्या वापरावर विशेष भर दिला. 
 
केंद्रीय मंत्री म्हणाले, 'मला पूर्ण विश्वासाने सांगायचे आहे की येत्या पाच वर्षांत भारतात पेट्रोल गायब होईल. तुमच्या कार आणि स्कूटर एकतर ग्रीन हायड्रोजनवर किंवा इथेनॉल फ्लेक्स इंधन, सीएनजी किंवा एलएनजीवर चालतील. पुढील पाच वर्षांत या क्षेत्राचा विकास दर सध्याच्या 12 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवावा, असे आवाहनही गडकरींनी कृषी क्षेत्रातील अभ्यासकांना केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत हुशार आहेत. त्यांना नवनवीन संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान अवगत करून हुशार बनवण्याची गरज आहे. 
 
गडकरींनी गेल्या महिन्यात भारत-NCAP म्हणजेच भारताच्या नवीन कार सुरक्षा मूल्यांकन कार्यक्रमाच्या लाँचबद्दल माहिती दिली होती. याअंतर्गत आता क्रॅश टेस्टमधील कामगिरीच्या आधारे कारला देशात स्टार रेटिंग दिले जाणार आहे. यामुळे भारतात धावणाऱ्या आणि विकल्या जाणार्‍या कारच्या सुरक्षिततेची खात्री होईल. 

संबंधित माहिती

राहुल गांधींनी अग्निपथ योजनेबाबत राष्ट्रपतींना पत्र लिहून विनंती केली

मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करीन - एक्झिट पोल सर्वेक्षणादरम्यान आप उमेदवार सोमनाथ भारती म्हणाले

गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत, संपत्तीत मुकेश अंबानींना मागे टाकले

महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी? जाणून घ्या विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज

यूपीमध्ये भाजपची आघाडी

Exit Poll 2024: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का, बंगालमध्ये रणधुमाळी

Dinesh Karthik Retirement: दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

Exit Poll 2024: केरळपासून कर्नाटकपर्यंत भाजपचे काय होणार?जाणून घ्या

Maharashtra Goa Exit Poll Result 2024: महाराष्ट्रातील 48 आणि गोव्यात 2 जागांवर एनडीए आणि इंडियामध्ये समान लढत

अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणा वरून हा आरोप केला

पुढील लेख
Show comments