Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदीकडून पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल

Webdunia
सोमवार, 1 एप्रिल 2019 (17:16 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना मोदी यांनी मावळमधील गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत, शरद पवार यांनी शेतकऱ्यांची पर्वा केली नाही. ते शेतकऱ्यांना विसरले, अशी टीका केली. तसेच पवार कुटुंबात गृहकलह असून त्यांची पक्षावरची पकड गेली आहे. पुतण्याच्या हातून शरद पवारांची हिट विकेट गेली, असेही टीकास्त्र त्यांनी सोडले. 
 
पंतप्रधान बनण्याची स्वप्ने बघणाऱ्यांनी आता निवडणुकीत माघारी घेतली, असा टोलाही मोदी यांनी लगावला. शरद पवार केंद्रात १० वर्षे कृषिमंत्री होते. मात्र, त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काही चांगले केले नाही, असाही आरोप त्यांनी केला.
 
महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीची युती कुंभकर्णासारखी आहे. ते जेव्हा सत्तेत असतात तेव्हा ६-६ महिने झोपतात. सहा महिन्यात एक कोणीतरी उठतो आणि जनतेचा पैसा खाऊन पुन्हा झोपी जातो, असे टीकास्त्र मोदी यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीवर सोडले. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments