suvichar

मोदीकडून पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल

Webdunia
सोमवार, 1 एप्रिल 2019 (17:16 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना मोदी यांनी मावळमधील गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत, शरद पवार यांनी शेतकऱ्यांची पर्वा केली नाही. ते शेतकऱ्यांना विसरले, अशी टीका केली. तसेच पवार कुटुंबात गृहकलह असून त्यांची पक्षावरची पकड गेली आहे. पुतण्याच्या हातून शरद पवारांची हिट विकेट गेली, असेही टीकास्त्र त्यांनी सोडले. 
 
पंतप्रधान बनण्याची स्वप्ने बघणाऱ्यांनी आता निवडणुकीत माघारी घेतली, असा टोलाही मोदी यांनी लगावला. शरद पवार केंद्रात १० वर्षे कृषिमंत्री होते. मात्र, त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काही चांगले केले नाही, असाही आरोप त्यांनी केला.
 
महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीची युती कुंभकर्णासारखी आहे. ते जेव्हा सत्तेत असतात तेव्हा ६-६ महिने झोपतात. सहा महिन्यात एक कोणीतरी उठतो आणि जनतेचा पैसा खाऊन पुन्हा झोपी जातो, असे टीकास्त्र मोदी यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीवर सोडले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरतील महावितरण वीज यंत्रणा बळकट करणार

विदर्भात १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, शिक्षण विभागाला नोटीस बजावली

नागपुरतील महावितरण वीज यंत्रणा बळकट करणार

सुपर चेस क्लासिकच्या सलामीच्या सामन्यात प्रज्ञानंद फिरौजाविरुद्ध खेळणार, गुकेशने माघार घेतली

नवी मुंबईत भारत-आफ्रिका आंतरराष्ट्रीय व्यवसाय केंद्र उभारले जाणार, सिडको आणि एआयईएफ यांच्यात मोठा करार

पुढील लेख
Show comments