Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेत्याच्या पाठीशी असलेल्या शक्तीशी लढा देत आहोत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी

Webdunia
सोमवार, 18 मार्च 2024 (09:28 IST)
जनतेला वाटत असेल आम्ही एका विशिष्ट पक्षाशी, नेत्याशी लढा देतोय मात्र असे नसून आम्ही त्या नेत्याच्या पाठीशी असलेल्या शक्तीशी लढा देत असल्याचे सांगत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह आरएसएसवर हल्लाबोल केला. मोदी केवळ चेहरा आहे. ५६ इंचाची छाती नाही, ते फक्त केवळ पोकळ व्यक्ती आहेत, असे म्हणत त्यांच्या पाठीशी असलेल्या शक्तीनेच मणिपूरमध्ये हिंसाचार घडविल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला.
 
काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेने झाला. यावेळी इंडिया आघाडीतील नेत्यांनी एकजूट दाखवित शक्तीप्रदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची रविवार दि. १७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा पार पडली असून इंडिया आघाडीतील दिग्गज नेत्यांनी दमदार शक्तीप्रदर्शन केले. या सभेला देशातील दिग्गज नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागले होते. विशेष म्हणजे शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केलीे.
 
मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या आजच्या सभेला राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मिरचे नेते फारुख अब्दुल्ला, महेबुबा मुफ्ती, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी गांधी म्हणाले की लग्नासाठी १० दिवसात इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरु झाला. मग देशात इतर ठिकाणी विमानतळ बांधायला एवढा वेळ का लागतो, असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत. विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला सरकार तयार नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. २२ लोकांकडे देशाची सर्व संपत्ती एकवटली आहे, असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मुंबई आणि आसपासच्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणी आरबीआय कडून ग्राहकांना मोठा दिलासा ,रुपये काढण्याची परवानगी

गडचिरोलीत सीआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडली,मृत्यू

फ्रान्समधील रशियन वाणिज्य दूतावासात स्फोट, मॉस्कोने म्हटले - दहशतवादी हल्ल्याचे संकेत

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला

पुढील लेख
Show comments