Festival Posters

बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी 10 कोटी रू निधी मंजूर

Webdunia
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी डिसेंबर, 2016 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून 10 कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला असून या व्यतिरिक्त चंद्रपूर शहरात 17 कोटी रू. किंमतीची अन्य विकासकामे मंजूर करण्यात आली आहे.
 
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2016 रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यानाच्या लोकार्पण सोहळयात बाबूपेठ परिसरातील स्टेडियमच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता त्यांनी केली असून बाबूपेठ परिसरातील स्टेडियमच्या सौंदर्यीकरणासाठी 1.50 कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील पठाणपुरा गेट ते बिनबा गेट बायपास रोडच्या बांधकामासाठी 10 कोटी रू. निधी, चंद्रपूर शहरातील बायपास रोड - महादेव मंदिर - समता चौक - नेताजी चौक - बालाजी मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामासाठी 5.50 रू. निधी मंजूर करण्यात आला आहे.
 
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी या आधीही 15 कोटी रू. निधी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला आहे. या आधी दिनांक 15 ऑक्टोबर 2016 रोजीच्या नगर विकास विभागाच्या पत्रान्वये महानगरपालिकांना वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या शीर्षाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी 20 कोटी 12 लक्ष रू. निधी त्यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला असून या अंतर्गत प्रामुख्याने शहरातील कोणेरी अर्थात कोहिनूर स्टेडियमचे नूतनीकरण, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचे नूतनीकरण, पोलीस विभागाकरिता अत्याधुनिक जीमचे बांधकाम, आधुनिक पध्दतीच्या पथदिव्यांची उभारणी आदी विकास कामांचा समावेश आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी ते १२वीच्या बोर्ड परीक्षा डिजिटल पद्धतीने घेणार

भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यासाठी आणि महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी मुंबईहून रवाना

"बच्चू कडू यांना मंत्री म्हणून नियुक्त करणे ही माझी खूप मोठी चूक होती" म्हणाले-उद्धव ठाकरे

रविवारी मेन आणि हार्बर लाईनवर मध्य रेल्वे कडून मेगा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द

महाराष्ट्र बोर्डाची नवी योजना, इयत्ता १०वी ते १२वीच्या बोर्ड परीक्षा डिजिटल पद्धतीने घेणार

पुढील लेख
Show comments