Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरेंनी काढली ‘कोश्यारींची होशियारी’, म्हणाले…

Webdunia
शनिवार, 30 जुलै 2022 (15:25 IST)
मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या टीकेचे धनी ठरत आहेत. भाजप वगळता सर्वपक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मनसेही राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झाली आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे मराठी माणसाला डिवचू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रातून दिला आहे.
 
राज ठाकरेंनी पुढे आपल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?, उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो, अशा शब्दांत राज यांनी कोश्यारी यांना थेट आणि स्पष्ट इशारा दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

राज्य सरकार कडून रेल्वे अपघातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर

LIVE: एमव्हीए मध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार

एमव्हीए मध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार , उद्योगमंत्री उदय सामंत यांचे वक्तव्य

जळगाव रेल्वे अपघातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले शोक

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी उडी घेतली, कर्नाटक एक्स्प्रेसची धडक, 11 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments