Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन: 100 सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांना अनोखी मानवंदना

Webdunia
शुक्रवार, 6 मे 2022 (12:14 IST)
राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात आज (शुक्रवार, 6 मे) अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.
 
या उपक्रमाअंतर्गत सकाळी 10 वाजता राज्यातील सर्व नागरिकांनी 100 सेकंद स्तब्ध राहावं, असं आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. त्यानुसार नागरिकांनी आहे त्याठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून या उपक्रमात सहभाग नोंदवला.
 
या निमित्ताने शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले आहे.
 
राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापुरात झाला होता. तर त्यांचं निधन वयाच्या 47व्या वर्षी 6 मे 1922 रोजी मुंबईत झालं होतं.
 
शाहू महाराजांच्या निधनाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संपूर्ण कोल्हापूरसह राज्यभरातील नागरिकांनी 100 सेकंदासाठी स्तब्ध राहून त्यांना मानवंदना द्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलं होतं.
 
ही स्तब्धता म्हणजे, राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या 100 व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे. सर्व व्यवहार 100 सेकंद थांबून लोकांनी ते असतील त्या ठिकाणी हे स्तब्धता रुपी वंदन द्यावं असा हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
 
शाहू महाराजांनी समाजातील दीनदुबळे आणि वंचितांसाठी जे प्रचंड मोठं कार्य केलं, त्याचं यावेळी स्मरण केलं जाणार आहे. शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा मिळण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं जिल्हा प्रशासनाने सांगितलं.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments