rashifal-2026

आम्हाला बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्यावी अशी मागणी राऊतांनी केली

Webdunia
शनिवार, 3 डिसेंबर 2022 (15:14 IST)
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रातील काही गावांवरचं दावा केला आहे. तसेच महाराष्ट्रात कन्नड भवन उभारण्याची घोषणा केली आहे. यावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जर इर्षेने कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमाभागातील लढा देत असतील आणि काही गावांवर ते हक्क सांगत सोलापूर किंवा कोल्हापूरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर महाराष्ट्रालाही बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्यावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावर भूमिका स्पष्ट केली.
 
राऊत म्हणाले की, हा देश फेड्रल स्टेट आहे, अनेक राज्यांचे मिळून एक देश बनला आहे, ही संस्थान नाही, राज्य आहे. प्रत्येक राज्याचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध आहेत, तसेच कर्नाटकसोबतही आहेत. मुंबईत अनेक राज्यांचे भवन आहे. राज्याचे मुख्यमंत्री काल नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले, हे नवीनचं मी ऐकलं. तिथून आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात आसाम भवन उभारण्याची घोषणा केली, आनंद आहे. एकमेकांच्या राज्यात जात राहिलं पाहिजे, यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता घट्ट होते. दिल्लीत जसं प्रत्येक राज्याचं भवन आहे. तस कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असेल की, कोल्हापूर, सोलापूरमध्ये कर्नाटकच्या संस्था उभ्या कराव्यात. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, मुंबईतही आम्ही कानडी बांधवांना अशाप्रकारची भवनं उभी करु दिली आहेत. अनेक कर्नाटक हॉल, भवन त्यांच्या नावे आहेत. कानडी बांधवांशी वाद असण्याचे कारण नाही पण ते इर्षेने सीमाभागातील लढा, काही गावांवर ते हक्क सांगतायत म्हणून सोलापूर किंवा कोल्हापूरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्यावी अशी मागणी राऊतांनी केली आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments