Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, १० वी, १२ वी च्या परीक्षाबाबत शिक्षणमंत्र्याची महत्वपूर्ण माहिती

important information
Webdunia
सोमवार, 4 जानेवारी 2021 (08:28 IST)
राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी रविवारी दिली.
 
कोरोनामुळे ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. गायकवाड यांनी परीक्षांच्या ढोबळ तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
 
सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाशी चर्चा करून शाळा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

व्यावसायिक वाहनांवर प्रादेशिक भाषेत सामाजिक संदेश लिहिण्याचा महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा निर्णय

LIVE: कुणाल कामराच्या ' वक्तव्याला 'सुव्यवस्थित कट' असल्याचा एकनाथ शिंदेंचा आरोप

1 एप्रिलपासून बँकिंगचे ‘हे’ नियम बदलणार

RR vs KKR Playing 11: राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघ आता बुधवारी एकमेकांसमोर येतील

BHIM UPI अॅप युजर्ससाठी चांगली बातमी, BHIM अॅपची आवृत्ती 3.0 लाँच

पुढील लेख
Show comments