Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा,रात्रीच्या कर्फ्यूबाबत केंद्रीय पथकाने काय सांगितले

Webdunia
शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:03 IST)
देशात केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी दोन्ही राज्यांची सरकारे निर्बंध वाढवण्यासाठी आढावा घेत आहेत.त्याचवेळी,केंद्रीय गृह सचिवांनी सल्ला दिला आहे की ज्या भागात जास्त कोविड -19 प्रकरणे आहेत,तेथे रात्री कर्फ्यू लावण्यात यावा.गृहमंत्रालयाने दोन्ही राज्यांसोबत बैठक घेतल्यानंतर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की,'संसर्गातील वाढ थांबवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.ज्या भागात जास्त प्रकरणे येत आहेत,तेथे रात्रीच्या कर्फ्यूचा विचार केला पाहिजे.या व्यतिरिक्त,कॉन्टॅक्ट ट्रेसिंग,लसीकरण मोहीम तीव्र करणे यासारख्या उपायांनाही वाढवावे लागेल.

गृहमंत्रालयाने या राज्यांना अतिरिक्त लस देण्याचे आश्वासन दिले आहे,जेणेकरून संसर्ग नियंत्रित केला जाईल.देशात आतापर्यंत कोविड लसीचे 61 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. देशातील अर्ध्याहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा किमान 1 डोस देण्यात आला आहे.ऑगस्टच्या मध्यापासून कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत पंतप्रधान कार्यालयात झाली बैठक, राहुल गांधीची उपस्थित, काँग्रेसने दिली ही सूचना

LIVE: "आम्ही दोघे, आमचे दोघे ठाकरेंची परिस्थिती अशीच राहील"-बावनकुळे

फडणवीसांनी शिंदेच्या आमदारांची वाय सुरक्षा काढून घेतली, शिंदे यांनी बैठक बोलावली, नाराज आमदार शिवसेना सोडतील का?

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेपाळी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

नाशिकमध्ये ट्रक क्रेनला धडकल्याने २ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

पुढील लेख