Festival Posters

राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता या जिल्ह्यांना रेड अलर्ट

Webdunia
शुक्रवार, 19 जुलै 2024 (10:02 IST)
सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्यानं राज्यातील काही जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

राज्यातील सातारा, रत्नागिरी, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्याना रेड अलर्ट दिले आहे. 
रायगड, कोल्हापूर, इतर दक्षिणी जिल्ह्यात मुसळधार पावसासह ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तसेच पालघर, ठाणे, नागपूर, वर्धा, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे अमरावती, या आठ जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. या भागातील नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

येत्या 22 जुलै पर्यंत हवामान खात्यानं हलक्या मेघसरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे शहरात हलक्या सरी तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.कोकण घाटमाथा आणि विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 
 
कोकण किनारपट्टी भागात गेल्या 3 ते 6 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्यानं राज्यातील 6 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येणारे हे चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. पावसासोबत वादळाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

नदी नाल्यांना पूर आले आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यत येत्या पाच दिवस यलो अलर्ट दिले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुणे एसीबीने एका सहकारी संस्थेच्या लिक्विडेटर आणि ऑडिटरला लाच घेताना रंगेहात पकडले

अमेरिका 7.0 तीव्रतेच्या भूकंपाने हादरली

LIVE: 31जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करा- सर्वोच न्यायालयाचे निर्देश

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

सरकारने विमान कंपन्यांसाठी भाडे निश्चित केले आणि विमान कंपनीला हा आदेश दिला

पुढील लेख
Show comments