Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठेकेदाराच्या भल्यासाठीच शिवाजीनगर उड्डाणपूल कामाला वारंवार मुदतवाढ – एकनाथ खडसे

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2022 (15:35 IST)
गेल्या काही वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ते अपूर्णावस्थेत आहे. जवळपास एक लाखावर लोकसंख्येला त्यामुळे भरपूर त्रास होत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. तरीही केवळ ठेकेदाराचे भले होण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जाते. जिल्ह्यात वाळूमाफियांनी गोंधळ घातलेला आहे. मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी होत आहे. प्रशासन त्यांच्यासमोर हतबल झाल्यासारखे चित्र असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला.
 
त्यांची सोडवणूक करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेबाबत पत्रकारांना माहिती दिली. जळगाव-अजिंठा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरूच आहे. शिवाजीनगर उड्डाणपूल व जळगाव ते अजिंठापर्यंतच्या महामार्गाचे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. जळगाव शहरात राष्ट्रीय महामार्गावरील सर्कलच्या आजूबाजूला अतिक्रमण झालेले आहे. गेल्या आठवड्यात तेथे अपघात झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नांवर लक्ष द्यावे, अशी विनंती खडसेंनी केली. या संदर्भात तातडीची बैठक घेऊन सूचना देण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले.

संबंधित माहिती

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments