Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला,वाहतूक विस्कळीत

Webdunia
सोमवार, 15 जुलै 2024 (10:04 IST)
सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नद्या, नाले धरणे तुडुंब वाहत आहे.  रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला रत्नागिरीतील खेड तालुक्यात शिवतर- नामदारे वाडी रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे.रस्ता वाहून गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाने मध्य राष्ट्रातील अनेक भागात 16 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. 
हवामान खात्यानुसार,  16 जुलैपर्यंत कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवार आणि सोमवारी कर्नाटक, केरळ आणि माहेमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.यासोबतच लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 
15, 16 आणि 17 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उत्तर आणि पूर्व भागात पाणी साचण्याची आणि पूरस्थिती निर्माण होऊ शकते. अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक नद्या, नाले, धरणे तुडुंब भरली आहेत. पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनाही त्रास होत आहे.
 
Edited by - Priya Dixit  
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments