rashifal-2026

भाजप शिवसेनेचे माध्यमांसमोरचे भांडण म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक

Webdunia
शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (09:30 IST)
निव्वळ आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारकडून दिलेली वचने पूर्ण होत नसल्याने माध्यमासमोर खोटी भांडणे करून देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत दिशाभूल केली जात असल्याची टीका नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तयार करण्यात आलेल्या एनसीपी कनेक्ट या अॅपची माहिती देण्यासाठी तसेच बूथ कमिट्या अधिक बळकट करण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गणनिहाय दौरा करत आहे. आज त्यांनी नाशिक तालुक्याचा दौरा केला.  यावेळी गिरणारे गण - मातोरी, देवरगाव गण -धोंडेगाव, गौवर्धन गण, विल्होळी गण, पिंप्री सय्यद गण,एकलहरे गण,  पळसे गण व लहवित गणाचा आढावा घेण्यात आला.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, प्रत्येक गावातील नागरिकांशी कनेक्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एनसीपी कनेक्ट हे अॅप तयार केले असून या माध्यमातून प्रत्येक नागरीक पक्षाशी जोडला जाणार असून त्यात्या भागातील नागरिकांच्या समस्या समजणार आहे. कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी जोडण्यासाठी एनसीपी कनेक्ट हे अॅप महत्वाचा दुवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील दरी देखील या माध्यमातून कमी होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले की, शिवसेना भाजप सरकारने देशातील जनतेचे स्वप्नभंग केले आहे. शेतकरी, युवक, महिला यांचे प्रश्न युती सरकारला सोडवता आले नाही. सद्याच्या सरकारकडून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतमालाचे भाव पडले असतांना सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची परिस्थिती आहे. देशातील दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले असतांना आद्यपपर्यंत १५ लाख लोकांना देखील रोजगार देऊ शकले नाही. केवळ घोषणाबाजी करणारे सरकार कडून प्रत्यक्ष कृती मात्र होताना दिसत नाही. आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासाची कामे झाली मात्र युती सरकारच्या काळात विकास खुंटला आहे.जिल्हा आणि तालुका प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्याला सरकार बदलण्याची गरज आहे. त्यामुळे आघाडीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर,आज सुनेत्रा पवार दिल्लीला पोहोचतील

LIVE: महाशिवरात्रीनिमित्त मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

तीन मुलांचा बळी देण्यासाठी अपहरण करून नेणाऱ्या तांत्रिकाला अटक

डबरा येथे नवग्रह पीठ कलश यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू, सात जखमी

महाशिवरात्रीनिमित्त मध्य रेल्वेने सीएसएमटीहून विशेष गाड्यांची घोषणा केली

पुढील लेख
Show comments