Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊत यांना स्मृतीभ्रंश झाला असावा : चंद्रकांत पाटील

Webdunia
सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (23:33 IST)
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या  निकालावरुन भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवल्यानंतर जल्लोष केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत, लाज वाटत नाही का? अशी टीका संजय राऊत  यांनी केली होती. या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी उत्तर दिलं आहे.
 
संजय राऊत यांना स्मृतीभ्रंश झाला असावा, ते सकाळी काय बोलतात दुपारी काय आणि रात्री काय बोलतात त्यांना आठवत नाही, भाजपचे बहुतांश नगरसेवक मराठी आहेत त्यामुळं मराठी भाषिकांचा पराभव कसं म्हणता येईल, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
 
एखाद्या निवडणुकीच्या निकाल त्यांच्या बाजुने असतो, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतो तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो, हे त्यांच्या स्वभावानुसारच आहे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
 

संबंधित माहिती

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकली क्रोधद्दष्टी, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

पुढील लेख
Show comments