Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी संकल्प यात्रा काढणार

Webdunia
शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (07:14 IST)
एक नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या प्रमुख मागणीसाठी  विविध विभागातील कर्मचारी जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर संकल्प यात्रा काढणार आहेत. येत्या २५ डिसेंबरला सेवाग्राम वर्धा येथील बापू कुटी पासून या यात्रेस सुरुवात होणार असून २७ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या विधिमंडळावर ही यात्रा धडकणार आहे.
 
एनपीएस योजना ही शेअर बाजारावर आधारित असल्याने या योजनेतून मिळणारी पेन्शन ही अनिश्चित स्वरूपाची आहे तसेच या योजनेत निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना जुन्या पेन्शन योजने प्रमाणे लाभ मिळत नसल्याचे उघड झाल्याने कर्मचाऱ्यांचा या योजनेस विरोध होताना दिसत आहे. मागील सात वर्षांपासून  राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर हिवाळी अधिवेशन, मुंबई येथील आझाद मैदान येथे मोर्चे, धरणे अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचारी एनपीएस ला विरोध करीत असून जुनी पेन्शन योजनेची मागणी करीत आहेत.
 
पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू होते तर पुरोगामी प्रगत म्हणणाऱ्या महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू का होत नाही हा संतप्त सवाल शासनास विचारण्यासाठी  जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पेन्शन संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेने केले आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

पुढील लेख
Show comments