Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी हे पत्र स्विकारत नाही म्हणत संभाजीराजे यांनी १५ पानी पत्र फाडले

Webdunia
शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (15:48 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काय करत आहोत, याबाबतचे पत्र संभाजीराजे छत्रपती यांना दिले आहे. एकुण १५ पानी हे पत्र आहे. पण या पत्राच्या निमित्ताने संभाजी राजे यांनी सरकारला लक्ष्य केले हे पत्र नांदेडच्या पालकमंत्र्यांनी दिले असते तर अधिक आनंद झाला असता,असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. त्यावेळी कार्यकत्र्यांनी यासाठीची प्रतिक्रिया म्हणून मुख्यमंत्र्यांचे पत्र फाडले.मी हे पत्र स्विकारत नाही, असेही संभाजीराजेंनी स्पष्ट केले नांदेडमध्ये पालकमंत्री सभेला हजेरी लावण अपेक्षित होते. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असले तरीही मराठा आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत.म्हणूनच त्यांची हजेरी आजच्या सभेला अपेक्षित होती. मराठा समाजाला सामाजिक आर्थिक मागास ठरवण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांनी घ्यायला हवी होती. पण आज ते कुठेही दिसत नाहीत, असाही चिमटा त्यांनी काढला. मराठा समाजाच्या मुक आंदोलनानिमित्ताने ते नांदेडमध्ये बोलत होते. कोल्हापूरच्या सभेला अशोक चव्हाणांच्या गैरहजेरीवरही त्यांनी टीका केली.
 
मुख्यमंत्र्यांचे पत्र फाडण्याच्या प्रतिक्रियेवर मात्र त्यांनी टीका केली.मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे बेशिस्त खपवली जाणार नाही.मी स्वतः कोणतेही काम बेशिस्तपणे करत नाही,अशा शब्दात त्यांनी पत्र फाडण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. मी मुख्यमंत्र्यांनी दिलेले पत्र स्विकारत नाही.मराठा समाजासाठी काय करतोय हे त्यांनी लिहिलय.पण पत्रामध्ये अनेक तफावती असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच मी या पत्राचा स्विकारत नसल्याचेही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांना पत्र द्यायचे होते, तर ते पालकमंत्र्यांच्या हस्ते द्यायचे होते, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments