Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेळघाटात भीषण दुष्काळ; अमरावतीत 11 गावांना टँकरने पाणी

Webdunia
शनिवार, 7 मे 2022 (21:47 IST)
विदर्भात सध्या सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे पाण्याचे जलस्त्रोत आटले असल्याने अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील लोकांची पाण्यासाठी वणवण  सुरू आहे. मेळघाटातील  चिखलदरा तालुक्यात 10 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 11 गावात टँकरने पाणी पुरवठा सध्या करण्यात येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.
 
तापमानवाढ व भूजलपातळी खोल गेल्याने उंचावरील खास करून मेळघाटातील गावांचे जलस्रोत कोरडे पडले आहेत. याकरिता काही योजना व विहीर अधिग्रहणासोबतच टँकरचे नियोजन केले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मेळघाटातील 10 गावे सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत असल्याने मे अखेरिस या ठिकाणी पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.
 
जिल्ह्यात पाणी टंचाईसाठी नवीन नळयोजना, विहीर अधिग्रहण, विहिरींचे खोलीकरण, नळ योजनांची दुरुस्ती, नवीन नळ योजना घेणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी घेणे, हातपंपांची दुरुस्ती, टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा करणे आदी उपाययोजना प्रस्तावित असून यावर काम सुरू असल्याचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments