Festival Posters

शरद पवार यांचं ‘त्या’ वक्तव्याबाबत अवघ्या पाच तासात यू-टर्न; म्हणाले, ‘मी असं बोललोच नाही’

Webdunia
शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (07:59 IST)
सातारा :  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी अजित पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होते. यावेळी शरद पवार म्हणाले, ‘अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही.’ मात्र अवघ्या ५ तासात शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत यु-टर्न घेतला आहे.
 
अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन शरद पवार यांनी घुमजाव केलं आहे. "अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही," असं शरद पवार म्हणाले. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.
 
'सुप्रिया सहजपणे बोलत असतील तर राजकीय अर्थ काढू नये'
शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. बारामतीहून साताऱ्यात पोहोचल्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबतच्या वक्तव्यावर भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना शरद पवार म्हणाले की, "अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालो नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही." "आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे कुणाचेही नेते नाहीत," असं शरद पवार यानी स्पष्ट केलं.
 
एकदा संधी दिली, परत संधी द्यायची नसते, मागायची नसते : शरद पवार
"फूट म्हणजे एखादा मोठा गट फुटला गेला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटे शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते आणि मागायची नसते," असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार हे पक्षात परत येतील का प्रश्नाचं अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं.
 
बावनकुळे म्हणतात शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच भाजपला पाठिंबा देतील?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरुन शरद पवार यांनी अतिशय खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली. "माझी त्यांची फार ओळख नाही. अलिकडेच त्यांना ओळखतो. साधारण या पदावर राहणाऱ्या व्यक्तीला काहीतरी तारतम्य ठेवायची एक कल्पना असते. पण ते ज्या पद्धतीने बोलतायत, की आम्ही लोकांनी यांच्यावर टीका करु नये, त्यांच्यावर टीका करु नये. उद्या त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर टीका केली तर कदाचित ते म्हणू शकतात. पण जे आमच्या पक्षातील लोक जे सोडून गेले त्यांच्यावर टीका केली तर याची चिंता बावनकुळेंना का वाटते कळत नाही. त्याबाबत यांचं मार्गदर्शन आम्ही मागितलं नाही. याचा अर्थ ते जे बोलतात त्यामध्ये तारतम्य नाही, ज्याच्या बोलण्यात तारतम्य नाही, त्याला फारसं एन्टरटेंट करु नये," असं शरद पवार म्हणाले.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Local body elections महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींकरिता ४७ टक्के मतदान झाले; मतमोजणी २१ डिसेंबर रोजी

LIVE: मुंबईतील मतदार धार्मिक राजकारण नाकारतील काँग्रेसचा दावा

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल राजस्थानच्या १० दंत महाविद्यालयांना दंड, न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला

Flashback : २०२५ मध्ये रवीना टंडनची मुलगी राशापासून ते सैफचा मुलगा इब्राहिमपर्यंत, या स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला

केंद्र सरकारने महाराष्ट्रात ८९,७८० कोटी किमतीचे ३८ रेल्वे प्रकल्प मंजूर केले

पुढील लेख
Show comments