Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परमबीर हा महाराष्ट्र सरकारचा जावई असल्यासारखं वर्तन का केलं जातंय, शेलार यांचा सवाल

Webdunia
मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (16:41 IST)
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी परमीर सिंग गायब होण्यामध्ये राज्यातील ठाकरे सरकार असल्याचा आरोप केला आहे. तसेच परमबीर सिंग सापडले तर ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडेल. यामागे मोठे कटकारस्थान असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत परमीबर यांचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारवर  आरोप केले होते.
 
परमबीर रस्ते मार्गे विदेशात गेला असेल तर ज्या राज्यांतून जाऊ शकतो. त्या राज्यात भाजपची सरकारं आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं होतं. नवाब मलिक यांचे आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोडून काढले आहेत.
 
आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक हे कपोलकल्पित आरोप करत आहेत. मुळात परमबीर सिंग यांच घर महाराष्ट्रात आहे.रेशन कार्ड, आधार कार्ड माहाराष्ट्रातील आहे.
 
मग तो महाराष्ट्रातून पळून कसा गेला, याचं उत्तर राज्यातील सरकारने द्यायला हवं.महाराष्ट्रात अशी कोणती एजन्सी आहे आणि असे कोण लोक आहेत.जे परमबीर यांना मदत करत आहेत. परमबीरच्या मार्फत राज्य सरकारनं अशा कुठल्या कारवाया केल्या आहेत की राज्याचे मुख्यमंत्री किंवा अन्य कोणताही मंत्री त्याच्याबद्दल तोंड उघडत नाही.
परमबीर हा महाराष्ट्र सरकारचा जावई असल्यासारखं वर्तन का केलं जातंय, असा सवाल शेलार यांनी केला.
 
परमबीर सिंगची मालमत्ता का जप्त केली गेली नाही ? लुकआउट नोटीसला उशीर का झाला ?परमबीर पळून जाईपर्यंत राज्य सरकारनं वाट का पाहिली ? अशा कोणत्या गोष्टी ठाकरे सरकारनं परमबीर सिंगकडून करुन घेतल्यात.ज्या उघड झाल्या असत्या तर अडचण झाली असती.परमबीर पळून गेलाच असेल तर यास महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे शेलार यांनी म्हटले.

संबंधित माहिती

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

पुढील लेख
Show comments