Dharma Sangrah

शिवसैनिक संतप्त : राज ठाकरेंना पक्षात का घेत नाही?

Webdunia
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018 (09:39 IST)
शिवसैनिक पक्षावर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांचा संताप उफाळून आला आहे. मुंबईत  राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी विचारला आहे. ईशान्य मुंबईची 'नवनिर्माण शिवसेना' असे नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये बॅनरबाजी केली आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत तणाव वाढला आहे. 'राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?' असा सवाल शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून विचारला आहे.
 
पोस्टरवर काय लिहिलंय?
 
ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांचा लोकांना सल्ला; म्हणाल्या...

Heat wave warning महाराष्ट्र जास्त का तापत आहे? विदर्भाने राजस्थानला मागे टाकले; भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला

ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा मिळणार की कठोरता वाढणार? बैठकीनंतर मराठी अनिवार्यतेबाबत मंत्री सरनाईक म्हणाले.....

न्यूझीलंडसोबतच्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या

पुढील लेख
Show comments