Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणून चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले

Webdunia
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (08:37 IST)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे खूप नशीबवान आणि भाग्यवान नेते आहेत, केवळ 12 वर्षे सन्याशी म्हणून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर पक्षाचे काम केले. तेवढ्यावर त्यांना महसूल, सहकार, बांधकाम अशी महत्त्वाची खाती मिळाली, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळेले, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला आहे. 12 वर्षे संन्याशी म्हणून काम केल्यावर एवढे सारे मिळते हे माहीत असते तर मी पण केलं असतं, असा चिमटाही हसन मुश्रीफ यांनी काढला.भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. 
 
मुश्रीफ पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील हे धाडसी नाहीत. थेट आरोप करण्याचे त्यांचे धाडस झाले नाही. म्हणून त्यांनी सोमय्या यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. ते गृहमंत्री अमित शहा यांचे मित्र आहेत. त्यांच्या बरोबर संन्याशी म्हणून 12 वर्षे त्यांनी पक्षाचं काम केलं. या मैत्रीमुळेच त्यांना राज्यात अतिशय महत्त्वाची खाती मिळाली. रस्त्यांच्या कामात त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणार आहे.
 
हसन मुश्रीफ म्हणाले, मागील काही दिवस ते आपल्या विरोधात माहिती गोळा करत होते.सोमय्यांना माहिती पुरवत होते. याची कुणकुण आम्हाला लागली होती. कारण दादा हे मुक्त विद्यापीठ असल्याने त्यांच्या पोटात काही राहत नाही.हे कागदपत्र आले का, ते कागदपत्र आले का अशी विचारणा अनेकांसमोर ते करत होते, असे मुश्रीफ म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

अजित पवार यांचा कंत्राटदारांवर कोणतेही काम न करता बिले सादर केल्याचा आरोप

लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या

नागपूर रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात टळला,तेलंगणा एक्सप्रेसमधील प्रवासी थोडक्यात बचावले

मालीमध्ये सोन्याची खाण कोसळल्याने 42 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

पुढील लेख
Show comments