Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काही अप्रिय घटना घडू नये : हायकोर्ट

Webdunia
शपथविधी कार्यक्रमाबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. आमची प्रार्थना इतकीच आहे की काही अप्रिय घटना घडू नये अशी चिंता मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली आहे. पण हायकोर्ट हा शपथविधी सोहळा थांबवू शकत नाही. मात्र, संबंधित यंत्रणांना सुरक्षेची खातरजमा करण्यास सांगू शकते, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्कवर होत आहे. २०१० मध्ये मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने ही काळजी व्यक्त केली आहे. २०१०मध्ये शिवाजी पार्कला शांतता क्षेत्र घोषित करण्यात यावे म्हणून वीकम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने कोर्टात याचिका दाखल केली होती.
 
त्यानंतर शिवाजी पार्क परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक मैदानांवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा पायंडा पडू नये. नाहीतर जो तो उठेल आणि अशाप्रकारच्या कार्यक्रमांसाठी सार्वजनिक मैदानांचा वापर करेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.अजूनही काहीजण मैदानाचा अशा प्रकारे मैदानाचा वापर करण्यास मागणी करू शकतात, असे खंडपीठाने नमूद केले आहे.

संबंधित माहिती

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

पुढील लेख
Show comments