Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरगुती वादातून भांडण झाल्यामुळे जावयाने घराला पेटविले

Webdunia
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (08:13 IST)
बुलडाणातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे घरगुती वादातून भांडण झाल्यामुळे जावयाने घराला पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. घराला आग लावून पूर्ण कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोनाळा पोलीसांनी जावयाला अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्याच्या टुनकी येथील कस्तुराबाई मंडासे या महिला तसेच त्यांची मुलगी आणि नातवंडे घरी होत्या. यावेळी त्यांचा जावई अंबादास झाल्टे हा दारु पिऊन त्यांच्या घरी आला. तसेच काही वेळा फोनवर बोलला. त्यानंतर त्याचा मोबाईल परत मागितला असता त्याने कस्तुरबाईसह मुलीला शिवीगाळ केली. तसेच मोबाईल जमिनीवर आदळून फोडून टाकला. यावेळी मोबाईल का फोडला ? असे विचारले असता त्याने कस्तुरबाईच्या मुलीला लाथाबुक्क्याने मारहण करुन जिवे मारुन टाकेल, अशी धमकी देखील दिली.
 
नंतर घर पेटवून देण्याची धमकी दिली. मात्र जावई अंबादास झाल्टे हा एवढ्यावरच न थांबता त्याने प्रत्यक्षपणे घर पेटवून दिले. यामध्ये कस्तुरबाई यांच्या घरातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि जीवनावश्यक वस्तू जळून गेल्या आहेत. यामध्ये सुदैवाने मुली आणि नातवंडांसह घराबाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला.हा प्रकार घडल्यानंतर कस्तुरबाई यांनी जावयाविरोधात सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी अंबादास झाल्टे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी जावयाला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments