Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकशाहीमध्ये अशाप्रकारचं कावीळ झाल्यासारखं वागणं हे अत्यंत अयोग्य आहे

devendra fadnavis
Webdunia
बुधवार, 24 मे 2023 (21:18 IST)
नवीन संसद भवन कार्यक्रमाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. यासंदर्भातलं एक पत्रकही विरोधकांनी जारी केलं आहे. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी यावर खरमरीत उत्तर दिलं आहे. कावीळ झाल्यासारखं वागणं बरोबर नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
 
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
“लोकशाहीमध्ये अशाप्रकारचं कावीळ झाल्यासारखं वागणं हे अत्यंत अयोग्य आहे. नवीन संसद भवन हे देशाची शान आहे. जेवढ्या कमी वेळात हे तयार झालं आहे त्यामुळे देशाची ताकद दिसते आहे. जेवढ्या भव्यतेने हे संसद भवन तयार झालं आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे. मात्र मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत. ते कारणं सांगत आहेत ती हास्यास्पद आहेत. यापूर्वी १९७५ ला लोकसभेच्या एनएक्स इमारतीचं उद्घाटन स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी केलं होतं. मग ते लोकशाही विरोधी होतं का? यापूर्वी संसदेची जी भव्य लायब्ररी आहे त्याचं भूमिपूजन स्वर्गीय राजीव गांधींनी केलं होतं. ते लोकशाहीविरोधी होतं का? “
 
विरोधी पक्षांना पोटदुखी होते आहे
मूळात यांचा प्रश्न एवढाच आहे की वर्षानुवर्षे नवीन संसद भवन व्हायची चर्चा व्हायची ते कुणी बनवू शकलं नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते संसद भवन बनवून दाखवलं त्यामुळे कुठेतरी पोटात दुखतंय आणि तेच दिसतं आहे. विरोधी पक्षांनी जो निर्णय घेतला आहे त्यावरुन हेच दिसतं आहे की त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिकमधील दर्ग्यावरून दगडफेक 21 जखमी, 15 जणांना अटक

नाशिकमधील दर्ग्यावरून दगडफेक 21 जखमी, 15 जणांना अटक

Nagpur Violence आरोपीचे घर पाडणे चुकीचे होते असे म्हणत नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात मागितली माफी

इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मराठीवर बंदी घालण्यात आल्याने मनसे संतप्त, शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा दिला

मोठी बातमी: गरुड जगन्नाथ मंदिराचा ध्वज घेऊन उडून गेला, दुर्घटनेची भीती

पुढील लेख
Show comments