Festival Posters

नाणार प्रकल्पाविरोधात काढलेल्या मोर्चाला परवानगी का नाकारली? – सुनिल तटकरे

Webdunia
गुरूवार, 12 जुलै 2018 (16:35 IST)
नाणार हा कोकणातील वातावरणाला छेद देणारा प्रकल्प आहे. कोकणातील जनतेच्या दृष्टीने नाणारचा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांची एक भावनिक बाजू आहे. त्यांनी काल काढलेल्या मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली?, असा संतप्त सवाल आ. सुनिल तटकरे यांनी सरकारला विचारला. तसेच सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.
 
सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीचे नोटिफिकेशन रद्द करण्याची घोषणा कोकणवासीयांसमोर केली होता. मुख्यमंत्री म्हणतात की ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. कॅबिनेट मंत्र्यांची भूमिका वैयक्तिक कशी असू शकते? राज्य सरकार रुल ऑफ डुईंग बिझनेस अनुसार चालणार आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी एक बाब स्पष्ट केली की नाणारविषयी सुभाष देसाईंचा अभ्यास झाला आहे पण सरकारचा झालेला नाही. ही सरकारमधील विसंगती आहे, अशी टीका त्यांनी केली. कोकणवासीयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे सरकार टेकू असलेले सरकार आहे, त्यामुळेच हे घडत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
 
सत्ताधारी पक्षातील आमदार राजदंड उचलतात. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते. विरोधी पक्षातील लोकांनी हे केलं असतं तर सदस्याला बडतर्फ करण्याची भूमिका घेतली गेली असती. पण काल खालच्या सभागृहात सदस्यांनी जे केलं त्यावर काहीच कारवाई केली गेली नाही असा आरोप तटकरे यांनी केला.
 
नाणारप्रकरणी आज विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाणारप्रकरणी आमदार सुनिल तटकरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडल्यानंतर तो प्रस्ताव सभापतींनी फेटाळला त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. त्यामुळे काही मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले मात्र त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही नाणारप्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व घटक पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन गोंधळ घातला. त्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात अनेकांचा मृत्यू

येथे पेट्रोल आणि डिझेल ६ रुपयांनी स्वस्त; सरकारने केली घोषणा

१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मराठी शिकणे अनिवार्य असेल, राज्य सरकारचा अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा

राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! मुंबईतील प्रसिद्ध 'एअर इंडिया' इमारत १६०० कोटींना विकत घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज शिर्डी दौरा; रेल्वे प्रवासाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

पुढील लेख
Show comments