Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

Webdunia
सोमवार, 10 डिसेंबर 2018 (08:52 IST)
सरकारने केवळ दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. शेतकर्‍यांना कोणताही मदतीचा हात हे भाजप सरकार देत नसून पिक विम्याचा पहिला हप्ता देण्याबाबत जर पिक विमा कंपन्यानी 17 डिसेंबरपर्यंत पुढाकार घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ मराठवाड्यात तालुका जिल्हास्तरीय व जानेवारी महिन्यात नागपूर व संभाजीनगर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. 
 
स्वाभिमानी शेतकर्‍यांच्या दुष्काळ व पिक विमा प्रश्नासाठी 17 डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत रस्त्यावर उतरुन तालुका, जिल्हास्तरावर मोर्चे काढणार आहे. तर जानेवारी महिन्यात विभागीय स्तरावर मोर्चे काढणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कंपन्यांनी 2 टक्के सीएसआर दुष्काळासाठी खर्च करावा. स्वत:च्या कंपन्यानी स्थापन केलेल्या सेवेभावी संस्थेसाठी खर्च करू नये असा आग्रह सरकारकडे धरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments