Dharma Sangrah

गरम पाकाच्या पातेल्यात पडून भाजलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 30 एप्रिल 2018 (17:10 IST)
गुलाबजामसाठीच्या साखरेच्या गरम पाकाच्या पातेल्यात पडून गंभीररीत्या भाजलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना हिरावाडीतील कालिकानगर येथे घडली आहे. या चिमुरडीचे नाव स्वरा प्रवीण शिरोडे असे होते.
 
या प्रकरणी उपचार घेत असतांना तिच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. पोलिसांनी मुलीच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
 
सविस्तर वृत्त असे की , हिरावाडी येथील कालिकानगर भागातील साईनाथ रो-हाउस नंबर चारमध्ये शिरोडे कुटुंबीय राहते. शिरोडे यांचा केटरिंग व्यवसाय आहे. रविवारी गुलाबजाम बनविण्यासाठी ऑर्डरसाठी लागत असलेल्या एका पातेल्यात साखरेचा पाक तयार केला होता.
 
पाक थंड होण्यासाठी ठेवला होता. याचवेळी तीन वर्षांची स्वरा ही खेळत असतांना पातेल्याजवळ गेली आणि या गरम पाकाच्या पातेल्यात पडली. 
 
पाक गरम असल्याने ती जबरदस्त भाजली.  ही गंभीर बाब लक्षात येताच शिरोडे कुटुंबीयांनी चिमुरड्या स्वराला उपचारासाठी जुना आडगाव नाक्यावरील खासगी रुग्णालयात स्वराला दाखल केले.
 
या रुग्णालयाने उपचारापूर्वीच सांगितलेली अनामत रक्कम भरून नातेवाइकांनी बाहेरून औषधेही आणून दिली. यानंतर दुपारच्या सुमारास उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यू झाला असे सांगितले. तेव्हा मात्र नातेवाईकांचा पारा चढला आणि हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. रुग्णालयाची तोडफोड केली आहे.
 
या तोडफोडीने तणाव निर्माण झाल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments