Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, औरंगाबादमध्ये सोमवार पासून लॉक डाऊन लागण्याची शक्यता

Webdunia
शनिवार, 6 मार्च 2021 (20:59 IST)
सध्या कोरोनाचा उद्रेग महाराष्ट्रात वाढत असल्याने महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे लॉक डाऊन लावण्याची स्थिती आली असून येत्या सोमवार पासून पुन्हा लॉक डाऊन लागणार आहे. हे लॉक डाऊन दहा दिवसांसाठी असणार आहे. असे संकेत औरंगाबादच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
 
औरंगाबाद मध्ये देखील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रशासना समोर हे मोठे आव्हानच आहे. या कोरोनाच्या रुग्णात वाढ होऊ नये म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला प्रशासना कडून वारंवार दिला जात आहे.तसेच कोरोनाबाबत नियमाचे पालन करावे असे देखील नागरिकांना सांगण्यात येत आहे. सध्या औरंगाबादला रात्रीची संचार बंदी लागू केली आहे. ही संचार बंदी प्रशासन ने 7 मार्च पर्यंत लागू केली आहे.असे करून देखील कोरोनारुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे.   
 
महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की रूग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली तर आम्हाला लॉक डाऊन लावण्याचा विचार करावा लागेल.या साठी प्राशासनिक अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. हे लॉक डाऊन 8 ते 10 मार्च पासून सुरू होऊन 18 किंवा 20 मार्च पर्यंत असण्याची शक्यता वर्तली जात आहे. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments