Marathi Biodata Maker

तापमानातील वाढ कायम, काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

Webdunia
शुक्रवार, 29 मार्च 2019 (09:48 IST)
राज्यात या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच कमाल आणि किमान तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू झाली. मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानातील वाढ कायम आहे. नगर येथे गुरुवारी राज्यातील उच्चांकी ४२.३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सोलापूर येथे ४२.२ तापमान नोंदविण्यात आले. या दोन्ही शहरांसह जळगाव, मालेगाव, सांगली, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ आदी ठिकाणी तापमान ४० ते ४१ अंशांवर पोहोचले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, नागपूर, वाशिम आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या अगदी जवळ आहे. 
 
राज्यात पुढील चार ते पाच दिवस उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे शनिवारपासून कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाद काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

वाढत्या इंधन दरांमुळे इंडिगो आणि एअर इंडियाने जून-जुलै महिन्यासाठीच्या देशांतर्गत विमानसेवा कमी केल्या

14 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 3 मृत्यू

LIVE: सुरक्षेच्या कारणास्तव पुण्याचे प्रसिद्ध सरसबाग आणि गणपती मंदिर दोन दिवस बंद

'महायुती'तील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; पंतप्रधान मोदींची घेतली भेट, जाणून घ्या काय झाली चर्चा

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा शोकांतिक शेवट; प्रियकराच्या आत्महत्येनंतर महिलेनेही संपवले जीवन

पुढील लेख
Show comments