Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विलासराव देशमुख फाऊंडेशनचे उत्तम काम जगवली जवळपास दोन हजार झाडे

Webdunia
शुक्रवार, 24 मे 2019 (09:53 IST)
लातूर जिल्हा हा आता दुष्काळग्रस्त आणि सतत पाण्याची कमतरता असा जिल्हा म्हणून देशात ओळखला जातोय. मात्र ही ओळख पुसण्यासाठी अनेक व्यक्ती व सामाजिक संस्था काम करतात. असेच एक काम विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून केले आहे. लौत्र  शहरातील विलासराव देशमुख मार्ग (जुने रेल्वे लाईन) हरीत करण्याचा निर्णय या संस्थेने घेतला.  या मार्गावर १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाच किलो मीटर म्हणजेच राजस्थान विद्यालय ते लातूर-बार्शी रोडवरील रेल्वे उड्डाण पुलापर्यंत दुतर्फा २०६७ सहा फुटांची निल गुलमोहराची झाडे लावण्यात आली़, दोन झाडांमध्ये चार मीटर अंतर ठेवण्यात आले़, या झाडांना दर १५ दिवसांला प्रति झाड ६० लिटर पाणी टॅकरद्वारे दिले जाते. आज १८२२ झाडे जगली़ असून सर्व झाडे १२ फुटाची झाली  आहेत. 
 
जंगलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. याला आपण आळा घातला पाहिजे. वृक्षारोपण केले पाहिजे. आपणही वैयक्तिक स्तरावर दर वर्षी एक झाड लावलं तर लातूरचे रूपडे बदलून जाईल. असे आवाहन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्याचे वनक्षेत्र ०.४ टक्क्याच्या जवळपास आहे ही बाब चिंताजनक आहे़. त्यामुळेच लातूरमध्ये वनक्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न आमदार अमित देशमुख यांच्या माध्यमातून होतो आहे़. वन विभागाच्या लातूर परिक्षेत्रात लातूर, औसा, रेणापूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तीन तालुक्यात एक लाख २० हजार वृक्षांची लागवड करण्याचा शासकीय कार्यक्रम असला तरी आमदार देशमुख यांनी वृक्षलागवडीत पुढाकार घेतला असल्यामुळे येत्या काही वर्षांत वृक्षलागवड व संगोपनात लातूर शहर क्रमांक एकवर राहिल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments