Festival Posters

राज्यात थंडीचा कडाका कायम

Webdunia
सोमवार, 31 डिसेंबर 2018 (17:06 IST)
राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांश भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर कोकणात लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्रातील थंडीची लाट तीव्र बनली असून, नगर 4.5, पुणे 6, नाशिक 7 अंश सेल्सिअस अशी किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, नागपुरात थंडीने गारठून दोघांचा मृत्यू झाला.
 
उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने येणार्‍या थंड वार्‍यांचा प्रभाव वाढला आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाची क्षेत्रे किंवा द्रोणीय स्थिती सध्या अस्तित्वात नाही.राज्यातील वातावरण निरभ्र असून, या सर्व स्थितीमुळे कोकण, मुंबईसह संपूर्ण राज्य थंडीने गारठल्याचे दिसते. दरम्यान, राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद विदर्भातील नागपूर येथे 4 अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. तर गोंदिया 5.2, वर्धा 7.5, अकोला 5.9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. येत्या 48 तासांत विदर्भात थंडीची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

बीएमसी निवडणुकीत हेराफेरीचे आरोप, वर्षा गायकवाड म्हणाल्या लोकशाहीवर हल्ला झाला, धमकावून उमेदवारांना काढून टाकण्यात आले

"मी माझ्या भावाचे स्वागत करण्यासाठी आलो आहे," पंतप्रधान मोदींनी यूएईच्या अध्यक्षांसाठी प्रोटोकॉल तोडला

ठाणे पोलिसांचे मोठे यश; मुंब्रामध्ये २७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

LIVE: आम्ही भाजपसोबत जिंकलो, आम्ही त्यांच्यासोबतच राहू… शिंदे गटाने स्पष्ट केले

नितीन नबीन भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्यास सज्ज

पुढील लेख
Show comments