Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सध्याचे सरकार अमर, अकबर, अँथोनीचे : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची टीका

Webdunia
सोमवार, 20 जानेवारी 2020 (16:37 IST)
सध्याचे राज्य सरकार हे अमर, अकबर आणि अँथोनीचे सरकार आहे. यांच्यात एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही. महायुतीच्या काळातील अनेक चांगल्या योजनांना ब्रेक लावू पाहणारे हे ब्रेक सरकार आहे. चांगल्या योजना बंद करणऐवजी त्यांनी त्याहून अधिक चांगल्या योजना आणून त्याची अंलबजावणी करावी, असे आव्हान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला दिले.
 
काही कार्यक्रमांनिमित्त नाशिक दौर्‍यावर आलेल दानवे यांनी भारतीय जनता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना आणल्या. त्यांची अंलबजावणीही सुरू केली. परंतु महाविकास आघाडीचे सरकार या योजना पुढे घेऊन जाण्याऐवजी ब्रेक करू पहाते आहे. त्यामुळे हे अमर, अकबर अँथोनींचे ब्रेक सरकार आहे. या सरकारमध्ये समाविष्ट असलेले पक्ष आणि नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोण व तत्सम इतिहास उकरून काढत हे सरकार बेरोजगारी, महागाई यासारख्या प्रश्नांपासून सर्वसामन्यांचे लक्ष विचलीत करीत आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न बाजूला पडत आहेत.
 
परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून हे सरकार निराशा करत असल्याचे लोकांच लक्षात येईल. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंना पोटगी द्यावी लागेल, माझगाव सत्र न्यायालयाचा आदेश

LIVE: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय

नागपुरात रामनवमीसाठी वाहतूक पोलिसांनी जारी केली ऍडव्हायजरी, वाहतूक कुठे वळवणार ते जाणून घ्या

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ताफ्याचे वाहन उलटले, तिघे जखमी

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरण माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि त्यांच्या पत्नी फरारी आरोपी म्हणून घोषित, मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

पुढील लेख
Show comments