Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानी प्रकरणी १५ मे रोजी सुनावणी होणार

Webdunia
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (17:58 IST)
ठाणे (महाराष्ट्र) महाराष्ट्रातील भिवंडीच्या एका कोर्टाने कांग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी ह्यांच्या विरोधात मानहानी च्या प्रकरणी सुनावणी १५ मे पर्यंत तहकूब केली आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (आरएसएस) च्या स्थानिक अधिकारी राजेश कुंटे ह्यांनी ठाण्याच्या भिवंडी मध्ये दिलेल्या राहुल गांधींच्या भाषणाला बघून २०१४ साली त्यांच्या वर खटला दाखल केला होता.या भाषणामध्ये कांग्रेस नेत्याने आरोप केले होते की महात्मा गांधी ह्यांच्या हत्ये मागे आरएसएसचा हात आहे.  
 
२०१८ मध्ये गांधी भिवंडी येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केले होते.त्यानंतर त्यांच्या विरोधात आरोप लावण्यात आले  आणि खटल्याची सुनावणी होऊ लागली.न्यायदंडाधिकारी जे.व्ही पालीवाल ह्यांच्या समोर  हे प्रकरण शनिवारी सुनावणी साठी आले तेव्हा 
 गांधी ह्यांचे वकील नारायण अय्यर ह्यांनी कोविड१९ चा हवाला देऊन कांग्रेच्या नेत्याला सुनावणी पासून सवलत देण्याची विनवणी केली आणि कोर्टाने तशी परवानगी देखील दिली.
कुंटे ह्यांचे वकीलपीपी जयवंत यांनी या प्रकरणी पुरावे म्हणून काही कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मिळावी या साठी मुंबई उच्च नायायालयात दाखल केलेल्या याचिकेत निवेदन देत सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली. 
 
दंडाधिकारी पालीवाल ह्यांनी सांगितले की हायकोर्टाने खालच्या कोर्टात खटल्याला स्थगिती देण्याचे आदेश दिले नाही. जयवंत ह्यांनी खटल्याला तहकूब करण्याची विनंती केली ह्याला कोर्टाने परवानगी दिली. कोर्टाने या खटल्यालची पुढील सुनावणीसाठी ची  मुदत १५ मे दिली असून त्याच दिवशी तक्रारदाराचे म्हणणे नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments