Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकार कडून रतन टाटा यांना पहिलाच'उद्योगरत्न पुरस्कार जाहीर

Webdunia
शुक्रवार, 28 जुलै 2023 (11:29 IST)
राज्य शासनाकडून आता दरवर्षी 'महाराष्ट्र भूषण म्हणून उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना सन्मान देण्यात येणार असल्याची घोषणा गुरुवारी विधानसभेत उद्योग मंत्री उदय सामंत  यांनी केली. या पुरस्कारासाठी राज्यातील पहिले मानकरी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती रतन  टाटा यांची निवड करण्यात आली असून त्यांना हा पुरस्कार दिला जाईल. महाराष्ट्र भूषण’च्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान केला जाणार आहे, 
उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना हा उद्योगरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक समितीची बैठक बोलावली होती. तसेच राज्यात उद्योगांच्या उभारणी आणि गुंतवणुकीसाठी परवानगी लागते. या लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानगी एकाच ठिकाणी मिळावी या साठीची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र उद्योग, व्यापार  गुंतवणूक सुविधा मिळावी म्हणून विधानपरिषदेत विधायक मांडले गेले. 

हा पुरस्कार राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर अपेक्षित आहे. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल. राज्य सरकार कडून उद्योगरत्न पुरस्कार सह युवा उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजक असे तीन पुरस्कार देखील देण्यात येणार आहे. अद्याप पुरस्काराचे स्वरूप आणि पुरस्कार कधी देण्यात येईल हे समजू शकले नाही. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments