Festival Posters

जो हातोडा चालवला होता तो कुणाच्या फोटोवर चालवला होता-आदित्य ठाकरे

Webdunia
शनिवार, 1 जुलै 2023 (21:44 IST)
''आठवड्यात वांद्रेत एका शाखेवर बुलडोझर चालवलं आहे. तुम्ही सगळे मुंबईकर, महाराष्ट्राचे आहात. तुमच्या मनातल्या सगळ्या भिंती बाजूला करुन बघा. जो हातोडा चालवला होता तो कुणाच्या फोटोवर चालवला होता. कुणी चालवला होता, आत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. ज्यादिवशी आपलं सरकार येईल त्यादिवशी यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा युवासेनाप्रमुख आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.
 
मी आज मुद्दाम मोर्चा घेतला. कारण शिवसैनिक म्हणून आपण लोकांशी बोलतो. लोकांना आजही वाटतंय की, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आमदार मिहीर कोटे यांनी हा घोटाळा केला. त्यांनी पत्र लिहिले तेव्हा बरोबर प्रश्नही विचारले होते. त्यांना वरुन फोन आला आणि मामला शांत करण्यास सांगितलं. आमदार रईस शेख यांनी दुसरं पत्र लिहिलं आणि त्यांना उत्तर आलं. पण मी पाठवलेल्या पत्राला उत्तर आलं नाही. मला जे उत्तर आलं, डीएमसींना वेगळ्या खात्यात टाकलं, तुम्हीच हे टेंडर बघा. एकाच व्यक्तीने टेंडर पूर्ण केलं पाहिजे. फेब्रुवारीला रईस शेख यांना याच डीएमसींनी उत्तर दिलं. पण त्यांची बदली झाली आहे. जेव्हा उत्तरं येतात तेव्हा औपचारिक पत्र येतात. डीएमसी काळे यांनी तीन अधिकाऱ्यांची समिती बनवली आहे. त्यांच्या समितीचा अभ्यास झाला की आम्ही उत्तर देऊ. नंतर मला उत्तर आलं की, तशी कमिटीच बनवलेली नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
 
Edited  By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार राज्य शासनाचा निर्णय

मानसिक छळाला कंटाळून नागपूरमधील 29 वर्षीय कबड्डीपटू किरणची आत्महत्या

"शारीरिक संबंध ठेवल्यास मी पगार वाढवीन"; अधिकाऱ्याच्या त्रासला कंटाळून कंत्राटी नर्सने केले विष प्राशन

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

इंडिगो संकटावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली

पुढील लेख
Show comments