Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खारघर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,-किरीट सोमय्या

Webdunia
शनिवार, 22 एप्रिल 2023 (09:14 IST)
‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन राज्य सरकारने केलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढत असताना सरकारने या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या नागरिकांसाठी शेडची व्यवस्था केली नाही. तसेच सुमारे अडीच ते तीन तास नागरिकांना उन्हात बसवून ठेवलं, यामुळे १४ जणांचा बळी गेला, असा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला.
 
या आरोपानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खारघर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
खारघर दुर्घटना घडल्यानंतर भाजपाचा एकही नेते मृतांच्या कुटुंबियांना भेटायला का गेला नाही? असं विचारलं असता किरीट सोमय्या म्हणाले, “मी स्वत: खारघरला गेलो होतो. पण तुम्ही म्हणता किरीट सोमय्या खारघरला गेले नाहीत. मी स्वत: खारघरला गेलो होतो. ही दुर्दैवी घटना आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सरकारने चौकशी अधिकारी नेमला आहे.”
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबई : रॅगिंग करणारे दोन एमबीबीएस विद्यार्थी निलंबित

आरएसएसच्या कार्यक्रमावर चाकू आणि काठ्यांनी हल्ला, 7-8 जण जखमी

भाजप आज जाहीर करणार 50 उमेदवारांची पहिली यादी ! MVA मध्ये 80 जागा अडकल्या !

टोमॅटोने भरलेला ट्रक उलटल्याने लुटण्यासाठी आला जमाव, रात्रभर पोलिसांनी दिला पहारा

महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का, आचारसंहिता भंग प्रकरणी महायुतीच्या शिंदे सरकारवर कारवाई

पुढील लेख
Show comments