Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दारू दुकानात मंदिरापेक्षा जास्त गर्दी, मग मंदिरे बंद का?

Webdunia
मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (22:40 IST)
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरला  दौऱ्यावर होते.माजी दिवंगत आमदार सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात फडणवीस आले होते.त्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.‘जेवढी गर्दी बारमध्ये होते,त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते.सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे,अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘आम्हा हिंदूंचे तेहतीस कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो.परंतु,अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते पुजारी असंख्य गरीब नागरिकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरं उघडा, मंदिरे बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे.तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता. परंतु, मंदिरे बंद ठेवता, असं फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments