Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचा वाद शिगेला, एकाची निर्घृणपणे हत्या

Webdunia
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (08:24 IST)
दोन महिन्यांपूर्वी मुलांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून हा वाद निर्माण झाला होता. या वादाची परिणती वडीलांच्या खूनात झाली आहे. नागपुरातील अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी येथे ही घटना घडली. पोलिसांनी हत्येचा आरोप असलेल्या तीनही आरोपींना अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नहारकर व महातो कुटुंबीय पांढराबोडी येथे शेजारी शेजारी राहातात. दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरील एका पोस्टवरून दोन कुटुंबात किरकोळ वाद झाला होता. मात्र हा वाद आतल्या आत धुमसत होता. त्याची परिणती अशोक संतराम नहारकर वय (४०) यांच्या खूनात झाली. या प्रकरणी भाऊ दिनेश संतराम नहारकर याने दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चेतन मुन्ना महातो हा प्रमुख आरोपी आहे. दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरील एका पोस्टवरून रितेश नहारकर व चेतन महातो यांच्यात किरकोळ वाद झाला. या दरम्यान रितेशच्या मित्राला चेतन महातो याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मित्र जीव वाचवून तिथून पळून गेला. रितेशला हे माहिती होताच तो जाब विचारण्यासाठी केतन महातोच्या घरी गेला. तिथे चेतनचा भाऊ राम मुन्ना महातो, वडील मुन्ना मोहन महातो एकत्र आले. त्यांच्यात वाद सुरू झाला.
 
दरम्यान रितेश महातोच्या घरी गेल्याचे कळताच त्याचे वडील अशोक संतराम नहारकर हे वाद सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी राम मुन्ना महातोच्या हातात चाकू होता. त्याने चाकूने अशोक नहारकर यांच्यावर वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या नहारकर यांना घेऊन मुलगा रितेश व भाऊ दिनेशने हॉस्पीटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments