Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॅाश कंपनीचा धक्कादायक निर्णय; एकाच वेळी ७३० ओजीटी कामगारांना दिला ब्रेक

Webdunia
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:02 IST)
नाशिक येथे  बॅाश कंपनीतील सुमारे ७३० ओजीटी कामगारांना  ब्रेक दिला. त्यामुळे कामगारांध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली नसली तरी या कामगारांनी थेट कामगार उपायुक्त कार्यालयात निवेदन दिल्यामुळे ही बाब समोर आली आहे. 

कोरोना काळात सर्वच ठिकाणी कामगार व पगार कपात होत असतांना बॅाश कंपनीने पगारवाढ करुन सर्वांना धक्का दिला होता. पण, त्यानंतर दुस-याच महिन्यात कंपनीने सुमारे साडेपाचशे कामगारांना व्हिआरएस दिले. त्यानंतर आता ही मोठी कामगार कपात केली आहे. आता कमी केलेले कामगार हे कायमस्वरुपी नसले तरी ते गेल्या काही वर्षापासून कंपनीत काम करत होते.आज त्यांना पहिल्याच शिप्टपासून ब्रेक देण्यात आला. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजेला सर्व ओजीटी कामगार ईएसआयसी ग्राउंडवर एकत्र आले. त्यानंतर त्यांनी चर्चा केली व त्यानंतर त्यांनी कामगार उपायुक्त कार्यालयावर जाऊन निवेदन दिले.कामगारांना कमी करुन शिका आणि कमवा या योजनेचे कामगार भरती करण्यावर कंपनीचा आता भर असणार असल्याचे बोलले जात आहे. या कामगारांना ईएसआयसी. पीएफ सह इतर सुविधा लागु असणार नाही. केवळ आठ ते दहा हजार रूपये टायपेन देवून तीन शिप्ट मध्ये या कामगारांकडून उत्पादन केले जाणार असल्याचीही चर्चा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबई : रॅगिंग करणारे दोन एमबीबीएस विद्यार्थी निलंबित

आरएसएसच्या कार्यक्रमावर चाकू आणि काठ्यांनी हल्ला, 7-8 जण जखमी

भाजप आज जाहीर करणार 50 उमेदवारांची पहिली यादी ! MVA मध्ये 80 जागा अडकल्या !

टोमॅटोने भरलेला ट्रक उलटल्याने लुटण्यासाठी आला जमाव, रात्रभर पोलिसांनी दिला पहारा

महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का, आचारसंहिता भंग प्रकरणी महायुतीच्या शिंदे सरकारवर कारवाई

पुढील लेख
Show comments