Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज : अशोक चव्हाण

Webdunia
शनिवार, 15 मे 2021 (09:29 IST)
मराठा आरक्षण फूलप्रूफ नव्हते यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्याने आणि भाजपचा भांडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे, अशी बोचरी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. 
 
सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड पाटील बेताल बोलत आहेत, असेही ते म्हणाले. मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा, अशी मागणी करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्याचा संदर्भ देत चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. 
 
भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आली आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजपने खोटे दावे केले होते. त्याचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने त्यांचा तोल जात आहे. योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी टीका केली आहे.
 

संबंधित माहिती

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments