Dharma Sangrah

नंदुरबारमध्ये लसीकरणाबाबत घेतला 'हा' महत्वाचा निर्देश

Webdunia
बुधवार, 19 मे 2021 (08:02 IST)
नंदुरबार जिल्ह्यात शेजारील जिल्ह्यातील नागरीक नंदुरबार जिल्ह्यात लस घेण्यासाठी बेकायदेशीररित्या प्रवेश करीत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अन्य जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास व त्यांचे लसीकरण करण्यास बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.
 
नंदुरबार जिल्हा आदिवासी बहूल व दुर्गम जिल्हा आहे. बाहेरील नागरीक येथे लसीकरणासाठी येत असल्याने लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासोबत कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता आहे. तसेच लसीकरणासाठी मर्यादीत प्रमाणात प्राप्त डोस विचारात घेता स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.
 
आंतर जिल्हा बंदी असल्याने अन्य राज्य किंवा जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या पासेसची पडताळणी करण्यात यावी. जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. अन्य जिल्ह्यातील नागरीक लसीकरणासाठी आल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना त्यांच्या जिल्ह्यात लसीकरण करून घेण्याबाबत कळविण्यात यावे.
 
कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897,  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 तसेच भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments