Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे हिंदुत्त्व नाही, कायद्याचा विषय आहे : संजय राउत

Webdunia
सोमवार, 2 मे 2022 (14:56 IST)
भोंगे हा विषय नाही, भोंग्यापेक्षा महत्त्वाचे विषय देशात आहेत. भोंग्यांना पॉवर कुणाची आहे हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्त्व नाही, कायद्याचा विषय आहे. कायद्याच्या चौकटीतील विषय आहे, असा टोला संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे.
 
संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भोंगे हा विषय नाही, भोंग्यापेक्षा महत्त्वाचे विषय देशात आहेत. भोंग्यांना पॉवर कुणाची आहे हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्त्व नाही, कायद्याचा विषय आहे. कायद्याच्या चौकटीतील विषय आहे. सुप्रीम कोर्ट, न्यायालयल आणि पोलीस यांचा विषय आहे. तुम्हाला काहीचं काम नसल्यानं याविषयावर बोलत असाल तर हे राष्ट्रहिताचं नाही. राष्ट्रीय एकात्मतेला ते मारक आहे. भोंग्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, यासाठी आम्ही आंदोलनं केली आहेत, लढाई केली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिले आहेत. या देशात जर कायद्याचं राज्य आहे. तर प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहीजे.
 
सीबीआयने केलेल्या तपासाची पानं या लोकांनी तपासावीत. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. त्यामध्ये शिवसेना कुठे आहे, असे विचारणारे अज्ञानी लोकं आहेत सगळे, त्यांना कळेल की नक्की त्यावेळी शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती. राम मंदिर उभं राहतय. तसेच वातावरण बदललेलं आहे. प्रश्न बदललेले आहेत. अशा वेळी मूळ प्रश्नावरचं लक्ष दूर करण्यासाठी भाजपा नेते आणि त्यांचे गुप्त साथीदार याकडे सर्वांना आकर्षित करण्याचं काम करतायत.पण लोकं त्यामध्ये पडणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांना इतक्या वर्षांनी फुलबाजे उडवायला काय झालं? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments