Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रक्षाबंधनादिवशी मंदिरावर झेंडा लावताना तिघांचा मृत्यू

Webdunia
Wardha News वर्ध्या येथे घडलेल्या एक दुर्देवी घटनेत मंदिरावर झेंडा चढवताना विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. वर्ध्याच्या पिपरी मेघे गावात आज बुधवारी सकाळी आठ वाजता ही दुर्घटना घडली. 
 
अशोक सावरकर(55), बाळू शेर (60) आणि सुरेश झिले (33) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
 
सर्वत्र रक्षाबंधन सण साजरा केला जात असताना ही घटना घडली. वर्ध्याच्या पिपरी मेघे गावातील तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावण्यासाठी तीन तरुण चढले होते. मंदिरातील झेंड्याचा खांब हा 25 फूट उंचीचा होता. झेंडा वरती चढवत असताना झेंड्याच्या लोखंडी खांबाचा तोल सुटून शेजारी असलेल्या 33 केव्हीच्या विजेच्या तारेवर पडला, ज्यामुळे तिघांनाही विजेचा धक्का लागला आणि तीनही तरुण विद्युत प्रवाहाचा जोरात झटका लागल्याने मंदिराच्या शेडवर पडले. 
 
या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments