Marathi Biodata Maker

सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2019 (12:57 IST)
रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घटनेतील मृत्यू हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. त्यामुळे या सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तिवरे धरण फुटल्याने परिसरातील सात गावे पाण्याखाली गेली होती. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण बेपत्ता आहेत. 
 
मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री तिवरे धरण भरून वाहू लागले होते. काही वेळाने धरणाला भगदाड पडल्याचे लक्षात आल्याने तलाठ्यांनी धरणाच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पण तासाभरातच धरण फुटले आणि परिसरातील गावांमध्ये पाणी शिरले होते. बेंड वाडीतील काही ग्रामस्थ वाहून गेले. आतापर्यंत सातजणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत असतानाच, विरोधकांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारी अनास्थेचे हे बळी आहेत. त्यामुळे या सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली आहे. 
 
जलसंपदामंत्र्यांनी राजीनामा द्यावा  
सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. शिवसेनेचे आदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. त्यामुळे आमदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

राज्य मंडळाचा इयत्ता पहिली ते नववीच्या निकाल प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल, उत्तरपत्रिका दाखवणे बंधनकारक

LIVE: संतोष देशमुखांच्या पत्नीचा दारुण पराभव

मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा दारुण पराभव

बच्चू कडू यांची मोठी घोषणा? शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चांवरून पर्दा खेचणार

ठेल्यावरील गोलगप्पे खाल्ल्याने एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, ४९ जणांना विषबाधा

पुढील लेख
Show comments