rashifal-2026

खासगी कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांच्या बस पलटी होऊन दोघे जण ठार तर ४८ जखमी

Webdunia
सोमवार, 12 डिसेंबर 2022 (07:45 IST)
मुंबईतील चेंबूर येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांच्या बस पलटी होऊन दोघे जण ठार तर ४६ विद्यार्थासह ४८ जखमी होण्याची घटना रविवारी रात्री  घाटात घडली. जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर लोणावळ्यातील मॅजिक घाटात ही दुर्दैवी घटना घडली असून जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
 
सर्वजण दहावीचे विद्यार्थी आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबवर रांगा लागून राहिल्या होत्या.पोलिसांच्या सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत झाली. भारतामध्ये एका मुलीचा समावेश असून दोघांचेही नावे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट समजलेली नव्हती.
 
चेंबूर येथील मयंक कोचिंग क्लास मध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची आज सकाळी लोणावळा येथे सहल काढण्यात आली होती .४८ विद्यार्थ्यांसमवेत क्लासचे दोन खाजगी शिक्षकही होते. सर्वजण लक्झरी बस (एम. एच.०४- जी पी-२२०४ )  बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने जात असताना रात्री आठच्या सुमारास जुन्या  घाट उतरताना न मॅजिक पॉईंट जवळ बस डाव्या बाजूला पलटी झाली.
 
अपघातामध्ये जवळपास सर्व विद्यार्थी जखमी झालेले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली व आजूबाजूच्या परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने हितिका दिपक खन्ना (वय १७ वर्षे, चेंबूर कॅंप) व राज राजेश  म्हात्रे (वय १६ वर्षे, असाल्फा व्हिलेज, लाल डोंगर चेंबूर) जागीच ठार झाले. बसमधील सर्व विद्यार्थी आनंदात गाणी म्हणत असताना अकस्मितपणे झालेल्या अपघातामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट झाली आरडाओरड आणि रडण्यामुळे  गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments