Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबादच्या दोन विद्यार्थ्यांचा काशीद येथे बुडून मृत्यू

Webdunia
मंगळवार, 10 जानेवारी 2023 (07:56 IST)
सहलीसाठी रायगडमधील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या औरंगाबादचे दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. चार विद्यार्थी समुद्रात बुडाले, यापैकी दोघांना वाचवण्यात यश आलं असून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल काशीद इथे आली होती. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
 
काशिद समुद्र किनाऱ्यावर पाण्यात उतरुन विद्यार्थी आनंद घेत होते. त्यापैकी काही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळं ते पाण्यात बुडाले. ही बाब समोर येताच खळबळ उडाली होती. स्थानिक बचाव पथकांनी प्रयत्न केल्यानं दोन जणांना वाचवण्यात आलं आहे. कृष्णा पाटील आणि कृष्णा वाघ यांना वाचविण्यात यश आले आहे. प्रणय कदम आणि रोहन संतोष बेडवाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.

Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments