Dharma Sangrah

दोन वर्षानंतर श्रावण मास उत्साहाने भरला,त्र्यंबकेश्वरला चार दिवसात पाच लाखा पेक्षा जास्त भाविक

Webdunia
बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (08:00 IST)
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच रविवार ,सोमवार ,मंगळवार सुट्टी या मुळे त्र्यंबकेश्वरला चार दिवसात पाच लाखा पेक्षा जास्त भाविक, यात्रेकरू येथे येण्याची शक्यता येथे वर्तवण्यात आली आहे. दोन वर्षानंतर श्रावण मास उत्साहाने भरला आहे. यात दीड लक्ष पेक्षा जास्त भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस जातील असा ही विविध यंत्रणांचा अंदाज आहे.
 
दरम्यान ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनातर्फे व श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट यंत्रणे तर्फे भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या आहेत. एस टी महामंडळा द्वारे ही भाविकांसाठी नियोजन केले आहे. त्र्यंबकेश्वरला शक्यतो भाविकांनी एसटी बसने प्रवास करावा असा सल्ला यंत्रणांनी भाविकांना दिला आहे.
 
पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे लक्ष घालून आहेत. गर्दीचा वेळी वेळी आढावा घेतला जात असल्याची माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली.
 
त्रंबकेश्वर मंदिर प्रशासन दक्ष असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.सध्या दररोज तीस ते पस्तीस हजार यात्रेकरू दर्शन घेत असल्याचा ट्रस्ट मंडळाचा दावा आहे.मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असून कायदा सुव्यवस्था भर देण्यात आल्याचे पोलीस अधिकारी कविता फडतरे रणदिवे यांनी सांगितले. स्वच्छता व नागरिक सुविधांसाठी नगरपालिकेने कंबर कसल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Local body elections महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींकरिता ४७ टक्के मतदान झाले; मतमोजणी २१ डिसेंबर रोजी

LIVE: मुंबईतील मतदार धार्मिक राजकारण नाकारतील काँग्रेसचा दावा

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल राजस्थानच्या १० दंत महाविद्यालयांना दंड, न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला

Flashback : २०२५ मध्ये रवीना टंडनची मुलगी राशापासून ते सैफचा मुलगा इब्राहिमपर्यंत, या स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला

केंद्र सरकारने महाराष्ट्रात ८९,७८० कोटी किमतीचे ३८ रेल्वे प्रकल्प मंजूर केले

पुढील लेख
Show comments