Dharma Sangrah

त्यावेळी फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे दोन वर्षे व्यस्त होते का?”

Webdunia
गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (16:10 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा यासंदर्भातील चौकशी करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी केली आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून राज यांनी ही मागणी केल्यानंतर आता शिवसेनेनं या मुद्द्यावरुन राज ठाकरेंना भाजपासंदर्भात इशारा दिला आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे गट आणि मनसेमधील जवळीक वाढत असताना मुंबईचासंदर्भ देतच शिवसेनेनं हा इशारा दिला आहे.
 
तळेगावमध्ये ११०० एकर जागेवरील प्रकल्प गुजरामध्ये हलवण्याचा निर्णय ‘वेदान्त’ने मंगळवारी जाहीर करत गुजरात सरकारसोबत समांजस्य करार केला. याच संदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याचं खापर आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीवर फोडलं. “या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल,” असं शिंदे म्हणाले. याचवरुन उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
 
“मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला याचे खापर आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले. काय तर म्हणे, या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल. हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते. त्यावेळी फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे दोन वर्षे व्यस्त होते का?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

किरण जॉर्जचा स्विस ओपनमधील प्रवास प्री-क्वार्टर फायनलमध्ये संपला

LIVE: सोलापूर पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा मोठा विजय

शिर्डीतील साईबाबांच्या भक्तांना एलपीजीचा फटका, लाखो भाविक प्रसादाशिवाय परतले!

पीएम किसान योजना : शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची भेट मिळाली

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परवाने बंधनकारक

पुढील लेख
Show comments